मराठी भाषा गौरव दिन
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा, साहित्यिक वारशाचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. या लेखातून मराठी भाषा गौरव दिनाचा इतिहास, उद्देश आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया.
मराठी ही राजभाषा
लोकांकडून जेव्हा एखादी भाषा अधिक प्रमाणात बोलीभाषा म्हणून वापरली जाते तेव्हा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४७ नुसार राजभाषा मान्यता देण्याची तरतूद आणि अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. मराठी भाषेचे उत्तम ज्ञान आणि त्यातील गोडीचे साहित्य क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान कवी कुसुमाग्रज यांनी दिले आहे आणि म्हणूनच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी, २०१३ रोजी त्यांचा वाढदिवस अर्थात २७ फेब्रुवारी हा दिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात यावा अशी घोषणा करण्यात आली.
काय आहे मराठी भाषेचे वैशिष्ट्य
भारतामधील २२ अधिकृत भाषांमधील एक भाषा म्हणजे मराठी
जगातील सर्वाधिक बोलीभाषेपैकी मराठी ही १५ व्या क्रमांकावर असणारी भाषा आहे, तर
भारतामधील ३ री भाषा गणली जाते
महाराष्ट्र आणि गोव्याची मराठी ही अधिकृत भाषा आहे
दीर्घ साहित्यिक वापसा आणि परंपरा असणारी अशी ही भाषा सर्वांना आपलीशी वाटते
मराठी भाषा गौरव दिन आणि राजभाषा दिन फरक
बरेचदा मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यामध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य तयार झाले आणि मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा मानण्यात आले. त्यामुळे १ मे राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या मराठीतील योगदानामुळे त्यांच्या वाढदिवशी
Source: https://url-shortener.me/EV0P
https://maharashtratimes.com/maharashtra/about-marathi-bhasha-divas